शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

दीड एकरात ढबू मिरचीचे १२ लाखांचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:04 IST

संजय माने ।लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी : पिकाचे योग्य नियोजन व वेळेत औषध फवारणी करून अस्मानी संकटातही चांगले उत्पन्न मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाकळी (ता. मिरज) येथील शेतकरी सुधीर जनगोंडा पाटील. केवळ दीड एकरामध्ये पाटील यांनी ढबू मिरची चे १२ लाखांचे उत्पादन घेतले आहे.मिरज पूर्वभाग ढबू उत्पादनात अग्रेसर म्हणून ...

संजय माने ।लोकमत न्यूज नेटवर्कटाकळी : पिकाचे योग्य नियोजन व वेळेत औषध फवारणी करून अस्मानी संकटातही चांगले उत्पन्न मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाकळी (ता. मिरज) येथील शेतकरी सुधीर जनगोंडा पाटील. केवळ दीड एकरामध्ये पाटील यांनी ढबू मिरचीचे १२ लाखांचे उत्पादन घेतले आहे.मिरज पूर्वभाग ढबू उत्पादनात अग्रेसर म्हणून ओळखला जातो. येथून गतवर्षी दररोज दोनशे ते अडीचशे टन ढबूची मुंबई व दिल्ली येथे निर्यात होत होती. आवक वाढल्याने दहा ते पाच रुपयापर्यंत दर घसरले. ही घसरण पाहता यावर्षी अनेक शेतकºयांनी ढबू उत्पादनाकडे पाठ फिरवली. काही शेतकºयांनी ढबूची लागण केली, मात्र मध्यंतरी पडलेल्या पावसामुळे रोगराई व मुळकुजव्यामुळे ढबू काढून टाकावा लागला. अशा अनेक संकटांवर मात करीत टाकळी येथील शेतकरी सुधीर पाटील यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. मल्लेवाडी येथे दीड एकरामध्ये जूनमध्ये ढबूच्या रोपांची लागण केली. त्यांनी पहिल्यांदा नांगरट व रोटर मारून बेड तयार करून घेतला. रसायन व शेणखत घातले. त्याच्यावर परत मातीचा बेड तयार करून मल्चिंग पेपर टाकून जून महिन्यात सव्वा फुटावर एक छिद्र मारून ढबूचे रोप लावले. पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला. दीड एकरामध्ये १४ हजार रोपांची लागवड केली. रोपांची लागवड केल्यापासून ४८ दिवसांत पहिली तोड आली. साडेचार महिन्यांमध्ये त्यांनी ५२ टन ढबूचे उत्पादन घेऊन १२ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. अजून दोन महिन्यांपर्यंत ढबूची तोड चालू राहणार आहे. त्यामुळे उत्पादनात आणखी वाढ होणार आहे. आवक कमी झाल्याने किलोस २५ रुपये दर मिळत आहे. मुंबई, दिल्लीसह अन्य भागात पाटील यांच्या ढबूची विक्री होत आहे.देशांतर्गत निर्यात घटलीपूर्वभागात द्राक्षबागा तोट्यात असल्याने बरेच शेतकरी ढबू उत्पादनाकडे वळले होते; मात्र गतवर्षी दर घसरल्याने यावर्षी मोजक्याच शेतकºयांनी ढबू उत्पादन घेतले आहे. पावसामुळे शेकडो एकर ढबूचे फड काढून टाकावे लागले. पूर्वभागात दरवर्षी सुमारे पाचशे एकरामधून दररोज दोनशे ते अडीचशे टन ढबूची निर्यात देशभरात होत होती. मात्र आता आठवड्यास केवळ २० ते २५ टन ढबूची निर्यात होत आहे.

टॅग्स :agricultureशेती